शेतकरी कर्जमाफी ; कर्जमाफीसाठी आणखी सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार

शेतकरी कर्जमाफी ; कर्जमाफीसाठी आणखी सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार

शेतकरी कर्जमाफी ; अनेक दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. तसेच उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असताना सुद्धा शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या बोज्यात दडपला जात आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून कर्जाच्या बोज्यात दडपलेल्या शेतकऱ्यांना काहीसा आधार द्यावा अशी मागणी शेतकरी तसेच शेतकरी संघटना कडून केली जात आहे.

 

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु असे प्रचार दौऱ्यात जाहीर सभेत सांगितले होते. परंतु लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर थोडा ताण आला असून राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

 

माणिकराव कोकाटे यांनी सांगितले कि येत्या चार ते सहा महिन्यात राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेईल. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे. येत्या बजेटमध्ये कर्जमाफीसाठी तरतूद करण्यात येईल, मात्र आणखी सहा महिने कर्जमाफीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शेतकरी कर्जमाफी

 

Leave a Comment

Close Visit agromedia24