कर्जमाफी होणार नाही : दोन दिवसांत पिककर्ज भरा अजित पवार यांचे वक्तव्य….

कर्जमाफी होणार नाही : दोन दिवसांत पिककर्ज भरा अजित पवार यांचे वक्तव्य….

कर्जमाफी होणार नाही : राज्यात महायुती सरकार सत्तेत येऊन चार महिने पुर्ण झाले आहेत. परंतु विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने जनतेला दिलेली आश्वासने सरकार अजूनही पूर्ण करत नाही.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीतील भाजप (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या नेत्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु दि. 28/मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना ठणकावून सांगितले की दोन दिवसांत आपआपले पिककर्ज भरा. अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दम देत सांगितल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.

 

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी आशा लागली होती. मात्र, या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत मोठे विधान केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दि. 28/मार्च रोजी एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफी होईल की नाही यावर स्पष्ट सांगितले.

अजित पवार म्हणाले सभागृहात उत्तर देताना मी असेही म्हटले होते की सर्व काही करता येते पण पैशाचे सोंग करता येत नाही. आज 28 मार्च आहे मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्टपणे सांगत आहे की 31/मार्चपर्यंत तुमचे पीक कर्ज भरा असे अजित पवार म्हणाले. पुढे तीन वर्षे कर्जमाफी होण्यासाठी परीस्थिती अनुकूल नाही.

अजित पवार यापूर्वी कर्जमाफीबाबत काय बोलले होते…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एका कार्यक्रमात म्हटले होते की तुम्ही माझ्या भाषणात कधी कर्जमाफीबद्दल ऐकले आहे का? असे अजित पवार यांनी विधान केले होते.

 

Leave a Comment

Close Visit agromedia24