जिवंत सातबारा अभियान : जिवंत सातबारा अभियानात शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळतील…

जिवंत सातबारा अभियान : जिवंत सातबारा अभियानात शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळतील…

जिवंत सातबारा अभियान : मृत व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन त्याच्या वारसांना हस्तांतरित करताना अनेक अडचणी येतात. ही प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने जीवंत सातबारा मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत, मृत व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन त्याच्या वारसाच्या नावावर हस्तांतरित केली जाईल.

महसूल विभाग १०० दिवसांचा आराखडा तयार करून ही मोहीम राबवेल. या १०० दिवसांच्या मोहिमेत, मृत जमीनदाराच्या वारसांना जमीन हस्तांतरित केली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना सरकारी सेवा आणि इतर सेवा योजनांचा लाभ घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि पारदर्शकता वाढेल.

महसूल विभाग यासाठी स्वतंत्र मोहीम राबवेल आणि मृत व्यक्तीच्या नावे सातबारा वरून काढून वारसाच्या नावाने केली जाईल आणि अर्जदाराने अर्ज न करता महसूल विभागाकडून ही मोहीम राबवली जाईल. 19/ मार्च रोजी याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला होता ज्यामध्ये 01/ एप्रिलपासून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना काय फायदा होईल?

जमीन मृत व्यक्तीच्या नावावर असल्याने, सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यात येणाऱ्या अडचणींपासून लोकांना सुटका मिळेल. तसेच मृत व्यक्तीच्या नावावरून जमीन वारसाच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी लागणारा खर्च आणि वेळ दोन्ही वाचेल. जिवंत सातबारा मोहिमेचे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतील.

Leave a Comment

Close Visit agromedia24