सौर कृषीपंप योजना : सौर कृषीपंपाच्या योजनेत बदल या शेतकऱ्यांना होणार फायदा
सौर कृषीपंप योजना : शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत एक महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केली आहे. त्यांनी विधानसभेत घोषणा केली की ज्या भागात पाण्याची पातळी कमी झाली आहे अशा भागात 10/Hp पंप बसवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांची घोषणा यावर्षीच्या सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 10 लाख पंप बसवण्याचा मानस आहे. परंतु काही भागात पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी 7.5 अश्वशक्ती आणि 10 अश्वशक्तीचे पंप बसवण्यास परवानगी दिली जाईल. परंतु 7.5 अश्वशक्तीपर्यंतच अनुदान दिले जाईल त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या पंपांसाठी अनुदान दिले जाणार नाही असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सौर कृषीपंप योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रता निकष खालिलप्रमाणे…
1) शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी आवश्यक पाण्याचा स्रोत असणे आवश्यक आहे.
2) शेततलाव, विहिरी, बोअरवेल किंवा बारमाही वाहणाऱ्या नद्या/नाल्यांजवळील शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील.
3) महावितरण संबंधित क्षेत्रात शाश्वत पाणी उपलब्ध आहे की नाही याची पडताळणी करेल.
4) अटल सौर कृषी पंप योजना -1 आणि 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजन चा लाभ घेतलेला नाही असे शेतकरी अर्ज करू शकतात.
सौर कृषीपंप योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे…
1) सौर MTSKPY’ पोर्टलला भेट द्या.
2) सुविधा टॅबवर क्लिक करा आणि नवीन अर्ज भरा.
3) वैयक्तिक माहिती, पत्ता, शेती आणि बँक तपशील भरा.
4) अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल.
5) कोणत्याही समस्येसाठी तालुका महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधा.