Shetkari karjmafi ; कर्जमाफीसाठी आणखी सहा महिने वाट पाहावी लागणार
Shetkari karjmafi – अनेक दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. तसेच उत्पादन खर्चात मोठी वाढ होऊनही शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली दबला जात आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना काही आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने आपल्या प्रचार दौऱ्यात जाहीर सभेत शेतकऱ्यांना कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करु असे सांगितले होते. मात्र लाडकी बहिन योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर काहीसा ताण पडला असून राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्या नंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
माणिकराव कोकाटे म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकार येत्या चार ते सहा महिन्यांत निर्णय घेईल. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती. आगामी अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी तरतूद करण्यात येणार आहे मात्र, कर्जमाफीसाठी आणखी सहा महिने वाट पाहावी लागणार आहे.