गहु पाणी व्यवस्थापन गहू पाणी नियोजन ; गहु तन व्यवस्थापन
आपल्या महाराष्ट्रात गहु हे एक रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पिक आहे. अधिक उत्पादन घेण्यासाठी गहु पिकाची वेळेवर लागवड, खुरपणी तसेच खत आणि पाणी व्यवस्थापन करणे खुप महत्त्वाचे असते. या पिकाला थंड हवामान पोषक असते. ढगाळ वातावरणामुळे या पिकात मर होऊ शकते. तर गहु पिकाला पाणी व्यवस्थापन कसे करावे हे सविस्तर पाहुया.
गव्हाला पाण्याच्या किती पाळ्या द्याव्या ?
गहु पिकाला पाणी व्यवस्थापन करत असताना जमीनीत भेगा पडण्याच्या आधी पाणी द्यावे. त्याचबरोबर आपल्या जमिनी नुसार किती दिवसानी पाणी द्यावे हे ठरवावे. हलक्या जमिनीत गहु पिकाला साधारण नऊ दहा पाण्याच्या पाळ्या देणे गरजेचे आहे. आणि भारी जमिनीत सहा सात पाण्याच्या पाळ्या द्याव्या.
गहु तन व्यवस्थापन कसे करावे?
गहु पिकात तन व्यवस्थापन कसे करावे याबद्दल खुप शेतकरी संभ्रमात आहे त. पण मजूराचा प्रश्न पाहता गव्हात खुरपणी करण्यासाठी जास्त खर्च आणि जास्त वेळ लागतो आणि तणनाशक हे कमी खर्चात आणि लवकर उपलब्ध होते.
खत व्यवस्थापन कसे करावे
गहु पिकाला पेरतेवेळी 10-26-26 सारख्या मिश्र खतांचा वापर करावा. आणि नंतर तिसऱ्या किंवा चौथ्या पाण्यासोबत युरीया हे खत द्यावे.
त्यानंतर गहु पिकाला खताची गरज नाही. फक्त वेळेवर पाणी व्यवस्थापन केल्यास गव्हाचे पिक चांगल्याप्रकारे येते. अशा पध्दतीने गहु पिकाची लागवड केल्यास आपल्या ला चांगले उत्पादन मिळवता येते.