Ladki bahin yojna ; लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल

Ladki bahin yojna ; लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल

महाराष्ट्र राज्यात 6 महिन्यांपूर्वी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे.

महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरल्यानंतर महाराष्ट्रात महिलांसाठी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून थेट आर्थिक लाभ देणारी योजना सुरू केली. 21 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील सर्व महिलांना काही माफक अटींसह लाडकी बहिण योजनेचा लाभ दिला जात आहे.

निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही योजना थांबवण्यात आली होती. राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेमुळे महायुती सरकारला खुप मोठा लाभ मिळाला. लाडकी बहिण योजनेमुळे जनतेकडून महायुतीला बहुमत मिळाले आहे. निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर आता आचारसंहिता देखील उठवण्यात आलेली आहे. आचारसंहिता संपल्या असल्याने महिलांना आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे.

निवडणूक होण्या आधी चर्चा सुरू होती कि लाडकी बहिण योजना निवडणूक झाल्यानंतर बंद होईल. निवडणूक झाल्यानंतर अजुन पर्यंत लाडकी बहिण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजुन आलेला नाही. त्यामुळे महिलांच्या व जनतेच्या मनात या योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आला आहे का असा प्रश्न आहे.

निवडणूक दरम्यान महायुती सरकारने लाडकी बहिण योजने विषयी घोषणा केली होती कि राज्यात पुन्हा एकदा महायुती च सरकार आलं तर महिलांना योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या 1500/- ऐवजी 2100/- हप्ता दिला जाईल.

जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेच्या निकषांमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही असे भाष्य केले असून महिलांच्या व जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment

Close Visit agromedia24