रामचंद्र साबळे अंदाज ; पावसात खंडाबाबद अचूक अंदाज, आता पाऊस कधी होनार सक्रिय
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी जून महिन्याच्या सुरुवातीलाच जून आणि जुलै महिन्यांमध्ये पावसाचा खंड पडेल, असा महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला होता. आता सद्यस्थिती पाहता, त्यांचा हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे, कारण महाराष्ट्रातील बहुतांश भागांतून पाऊस पूर्णपणे गायब झाला आहे. सध्या कडक ऊन आणि वाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, पावसाची प्रतीक्षा पुन्हा वाढली आहे.
सध्या पावसात खंड कशामुळे पडला ?
सध्या हवेच्या दाबात वाढ झाली आसून १९ ते २१ जून या काळात तो १००४ हेक्टोपास्कलपर्यंत वाढेल. या काळात पावसाचे प्रमाण कमी होनार आसून काही ठिकाणी कोरडे हवामान राहनार आहे
हवेचा दाब वाढला आहे आणि
अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान घटले आहे, ज्यामुळे बाष्पनिर्मिती कमी झाली आहे आणि याच कारणामुळे पाऊस उघडला आहे..
रामचंद्र साबळे अंदाज ; पुन्हा पाऊस कधी सक्रिय होनार ?
पावसातील खंड फार काळ नसनार आहे, 23 जूनपासून पुन्हा हवेचे दाब कमी होतील आणि समुद्राच्या पाण्याच्या प्रुष्ठभागाचे तापमान वाढेल आणि राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होईल अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.
रामचंद्र साबळे अंदाज ; मान्सून 2025
रामचंद्र साबळे यांनी यंदा सरासरीपेक्षा जास्त, म्हणजेच 106% पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता. यंदा
कमी दिवसांत जास्त पाऊस याचा अर्थ असा की, पाऊस पडेल तेव्हा त्याची तीव्रता अधिक असेल, ज्यामुळे कमी वेळेत जास्त पर्जन्यमान होईल.
काही काळ पावसात खंड हा त्यांच्या अंदाजाचा महत्त्वाचा भाग होता, जो आता प्रत्यक्षात अनुभवला जात आहे. जून-जुलैमध्ये पावसाचा खंड पडेल ही शक्यता त्यांनी वर्तवली होती.
अतिवृष्टी आणि महापुराची शक्यता, काही विशिष्ट भागांमध्ये अतिवृष्टी होऊन महापूर सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे.