Karjmafi ; कर्जमाफी संदर्भात मोठी बातमी, सरकारने बच्चुभाऊंना फसवलंय
Karjmafi ; बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांग व्यक्तींच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेले सात दिवसांचे उपोषण नुकतेच सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. सरकारने दिलेल्या या आश्वासनामुळे उपोषण संपले असले, तरी सरकारच्या भूमिकेवर आणि आश्वासनांच्या अंमलबजावणीवर अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत..
Karjmafi चा ठोस निर्णयच नाही..
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा
सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आश्वासन दिले आहे. या समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीवर निर्णय घेतला जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. तसेच, थकबाकीदार शेतकऱ्यांकडून होणारी सक्तीची वसुली थांबवून नवीन कर्जवाटप सुलभ करण्यावर चर्चा करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. मात्र, समिती अहवाल कधी सादर करेल किंवा कर्जमाफी प्रत्यक्षात कधी लागू होईल, याबाबत कोणतीही निश्चित कालमर्यादा देण्यात आलेली नाही.
दिव्यांग व्यक्तींसाठी मानधन वाढवण्याची दुसरी मागणी होती, तसेच इतर राहिलेल्या समस्यांवर संबंधित मंत्र्यांसोबत बैठकांमध्ये चर्चा केली जाईल, असे सांगितले जात असले तरी, याला लक्षणीय विलंब होण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांनी २ ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेन्याछी वाट पाहण्याचे सांगितले असले तरी, त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होईल त्यामुळे कर्जमाफी चा मुद्दा लांबनीवर पडन्याची शक्यता आहे..
Karjmafi ; खरंच शेतकरी कर्जमाफी होनार का ?
सरकारने केवळ समिती नेमण्याचे आणि चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु कर्जमाफी कधी मिळेल किंवा तिचे नेमके स्वरूप काय असेल, याबाबत कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. यामुळे शेतकरी आणि आंदोलकांमध्ये संताप आणि अविश्वासाचे वातावरण आहे.
बच्चु कडूंची सरकारकडून फसवणूक
कर्जमाफीची नेमकी तारीख किंवा त्यासाठीचे निश्चित निकष जाहीर करण्याऐवजी, केवळ ‘समिती नेमू’ किंवा ‘चर्चा करू’ अशा संदिग्ध शब्दांत सरकारने वेळ मारून नेली आहे. हे पत्र म्हणजे उपोषण संपवण्यासाठी केलेला एक दिखावा असून, यामुळे शेतकऱ्यांचा आणि दिव्यांगांचा प्रश्न जैसे थेच राहिला आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. निवडणुकांपूर्वी दिलेली आश्वासने पाळण्यात सरकार अपयशी ठरले असताना, आता बच्चू कडूंसारख्या जननायकाची अशा प्रकारे फसवणूक करणे, हे सरकारच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.