Crop insurance scheme : शेतकऱ्यांना 2555 कोटी रुपयांचा पिकविमा मिळणार…

Crop insurance scheme : शेतकऱ्यांना 2555 कोटी रुपयांचा पिकविमा मिळणार…

Crop insurance scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील तब्बल 64 लाख शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता 2555 कोटी रुपयांचा विमा भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. विमा कंपन्यांना थकीत राज्य हिस्सा अनुदान म्हणून 2852 कोटी रुपये वाटपास सरकारने मान्यता दिली आहे.

मागील अनेक हंगामातील प्रलंबित भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार-लिंक बँक खात्यात जमा केली जाईल. विमा कंपन्यांना ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले आहे.

खरीप 2022 आणि रब्बी 2022-23 च्या रब्बी हंगामासाठी 2.87 कोटी रुपये 2023 च्या खरीपसाठी 181 कोटी रुपये 2023-24 च्या रब्बी हंगामासाठी 63.14 कोटी रुपये आणि 2023-24 च्या रब्बी हंगामासाठी 63.14 कोटी रुपये भरपाई देण्यात येणार आहे. 2024 च्या खरीप हंगामासाठी 2308 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहे.

राज्यातील 64 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण 2555 कोटी रुपये मिळतील. सरकारने विमा कंपन्यांना निधी वितरित केला आहे आणि भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

 

Leave a Comment

Close Visit agromedia24