सोयाबीन हमीभाव खरेदी आणि नोंदणी साठी मुदतवाढ ; शेतकऱ्यांना दिलासा…
सोयाबीन हमीभाव ; सोयाबीनला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने केंद्र सरकारने यंदा हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातून 14 लाख 13 हजार टन सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. सोयाबीन खरेदीमध्ये सुरुवातीला ओलाव्याच्या अडचणीमुळे खरेदी काही दिवस खोळंबली होती त्यामुळे शेतकऱ्यांना आपले सोयाबीन वेळेवर विकता आले नव्हते.
सरकारने हमीभाव खरेदीसाठी 31/डिसेंबर हि शेवटची तारीख निश्चित केली होती परंतु बारदाना आणि ओलाव्याच्या अडचणीमुळे सरकारने यामध्ये मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांना आता 06/जानेवारी/2025 पर्यंत विक्रीसाठी नोंदणी करता येणार आहे आणि 12/जानेवारी/2025 पर्यंत सोयाबीनची विक्री करता येणार आहे.
सोयाबीन खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी उशीर झाला तसेच खरेदी सुद्धा अतिशय धिम्या गतीने खरेदी केली जात आहे. सध्या राज्यात 585 खरेदी केंद्राना परवानगी मिळाली असून 558 केंद्र सुरू आहे. नाफेडच्या 400 आणि NCCF च्या 158 केंद्रावर सोयाबीन खरेदी सुरू आहे. महाराष्ट्रातील सोयाबीनचे क्षेत्र पाहता खरेदी केंद्राची संख्या खुपच कमी आहे.
आपल्या महाराष्ट्रातील सोयाबीनची उत्पादकता पाहता 1000 पेक्षा जास्त खरेदी केंद्राची परवानगी आवश्यक होती. नाफेड आणि NCCF वरील केंद्रावर 5/लाख 24/हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. (Government scheme maharashtra 2015)
राज्यात 14/लाख 13/हजार टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट दिलेले असुन त्यापैकी पहिल्या टप्प्यात 10 लाख टन खरेदीला राज्याने परवानगी दिली होती. 10 लाख टन खरेदी झाल्यानंतर गरज भासल्यास त्यापुढील खरेदीला परवानगी दिली जाईल असे राज्याने स्पष्ट केले होते. पण आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील 10 लाख टन खरेदीचे उद्दिष्टही पूर्ण झाले नाही. आता दिलेल्या मुदत वाढीमध्ये किती शेतकऱ्यांची विक्री पुर्ण होते हे पाहण्यासारखे असेल. (Farmer news today)